‘‘मधुबनी’में लोकशाही…’ हा अग्रलेख (३ फेब्रुवारी) वाचला. समाजातील सर्व वर्गांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागलेले असते, कारण तो सर्वांच्या जगण्याशी संबंधित विषय आहे. आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प हा जवळपास सर्वच वर्गांना दिलासा देणारा आहे. ठेवींवरील टीडीएस मर्यादा ५० हजारांवरून एक लाख करण्यात आल्याने सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस सवलतीची मर्यादा वाढली आहे तर नोकरदार वर्गाच्या १२ लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, ही सवलत फक्त नवीन कर प्रणालीकडे आकर्षित करण्यासाठीच आहे. घरभाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर लागणाऱ्या कराच्या टीडीएस सवलतीची मर्यादा वाढवली आहे. आरोग्यासाठी ९६ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एआयसाठी पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे, ती वाढविणे आवश्यक होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारला झुकते माप देण्यात आले आहे. ‘राष्ट्रीय उत्पादन अभियान’ रोजगार निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. मुंबई मेट्रोसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढली ही स्वागतार्ह बाब असली, तरी यामुळे शेतकरी अधिक कर्ज घेऊन अधिक कर्जबाजारी तर होणार नाही ना, अशी भीती वाटते. काही वर्षांपासून रेल्वे ही सेवा राहिली नसून उद्याोग झाला आहे. लवकरच नवीन कर विधेयक संसदेत मांडले जाईल. त्याचबरोबर अर्थसंकल्पाबाबत अनेक सूची मांडल्या जातात त्या मांडल्यानंतर स्पष्टता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा