सोमवारपासून विधिमंडळाचे महत्वाचे अर्थसंकल्पीय अधिशेशन भरणार आहे. प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणायचे असेल तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ, गदारोळ न करता नेमके मुद्दे मांडावे लागतील. गेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी जवळपास साठ टक्के निधी का वापरला गेला नाही? नियोजन न करता निधीची तरतूद कशी काय करता, याचा जाब विचारला जावा. कृषी खात्यातील ‘पीक विमा योजना घोटाळा’ उघड केला गेला, त्यावर खुलासा मागितला जावा. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना या वर्षीच्या अर्थसंकल्पात दिल्या गेलेल्या निवडणुकीतील आश्वासनांची पुर्तता कशी करणार, यासारख्या अभ्यासपूर्वक अर्थ संबंधीत प्रश्नांचा भडिमार अधिवेशनात विरोधी पक्षांनी करावा. बलात्कार,खून हे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील व महत्वाचे प्रश्न आहेतच पण त्या करता गोंधळ, गदारोळ करून किंवा सभात्यागाद्वारे कामकाजावर बहिष्कार टाकू नये. तो जनतेच्या पैशाचा अपव्यय तर ठरेलच पण यातून सत्ताधारी पक्षाचे फावेल हे लक्षात घ्यावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा