‘परीक्षा पे चर्चा!’ हा अग्रलेख (३१ जानेवारी) वाचला. अर्थसंकल्पपूर्व लेखानुदानात सरकारने २०३० पर्यंत भारताची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठू शकेल असा दावा केला आहे आणि हे निश्चितच आशादायी आहे. ५ ट्रिलियन डॉलरवरून थेट ७ ट्रिलियन डॉलर म्हणजे ‘अधिकस्य अधिकं फलम्’ असेच म्हणावे लागेल. पण शिक्षण, आरोग्य या महत्त्वाच्या गोष्टींवरील खर्चाच्या तरतुदींचा विचार केला तर हे ७ ट्रिलियन डॉलर कुठे जाणार आहेत, असा प्रश्न पडतो. कुठल्याही विकसित देशात शिक्षण आणि आरोग्य यावर अधिक खर्च केला जातो. पण आपल्याकडे मात्र आरोग्य आणि शिक्षणावर कोणतीही भरीव तरतूद नाही त्याचवेळी इतर अनुदानांत मात्र कपात नाही! अनुदानात कपात करून ती तरतूद शिक्षण आणि आरोग्यक्षेत्राकडे वळविण्यास काय हरकत आहे? शिक्षण आणि आरोग्यावरील गुंतवणूक सरकारच्या दृष्टीने अनुत्पादक असेल तर अनुदान हीसुद्धा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अनुत्पादकच गुंतवणूक आहे. प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांना शिक्षण, आरोग्यापेक्षा महत्त्वाची वाटते! त्यामुळे अनुदानासारख्या अनुत्पादक गोष्टींवर भरीव तरतूद केली जाते! या अनुदानाच्या अभिलाषेपोटी दारिद्र्य रेषेखालील लोक वाढतच जाणार आहेत. असा देश महासत्ता ठरेल का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा