‘याची दखल घ्या!’ हा अग्रलेख (४ ऑक्टोबर) वाचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा राष्ट्राचा विचार प्राधान्याने करण्याबाबत आणि संघाच्या संरचनेत वरच्या श्रेणीत पोहोचलेल्या व्यक्ती या त्याग, नि:स्पृहता याबद्दल ओळखल्या जातात, त्यामुळे होसबाळे यांच्या उद्देशाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मात्र सत्ताधारी पक्षाच्या वैचारिक कुलातूनच अर्थस्थितीबाबत असे वास्तवदर्शन झाल्याने, त्याचा आदर करणे आवश्यक ठरते, ही अपेक्षा गैरवाजवी वाटते. मुदलात निवडणूक प्रक्रियेच्या अधीन असलेले आपण सर्वप्रथम जनतेला उत्तरदायी आहोत, याची तरी जाणीव सरकारला आहे का, याबद्दलच शंका आहे. त्यातच जे विरोध करतात ते विरोधक अशी सरधोपट मांडणी एव्हाना मान्यताप्राप्त झाली आहे. त्यामुळे राज्यकर्ते चुकीच्या धोरणांना जनहितासाठी, अगदी कुलप्रतिष्ठेसाठीही विरोध होऊ शकतो, हे स्वीकारण्यापलीकडे गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा