महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’ योजनेचा गाजावाजा करून महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची कोंडी झालेली दिसते. महिलांसह समाजातील विविध घटकांना थेट आर्थिक साह्य करणाऱ्या योजना राबवल्या तरच मते पडतील असे सत्ताधाऱ्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे जिथे निवडणूक असेल त्या राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्याआधीच एकमेकांमध्ये जुंपलेली असते. दिल्लीमध्ये नेमके हेच होताना दिसते. दिल्लीच्या अपूर्ण राज्यामध्ये सत्ता अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची आहे, या पक्षाला सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवायची आहे. हे केजरीवाल रेवड्यांचे जनक आहेत. दिल्लीमध्ये फेब्रुवारीमध्ये विधानसभेची निवडणूक असल्यामुळे याही वेळी केजरीवालांनी रेवड्यांची खैरात करायला सुरुवात केली आहे. केजरीवालांनी भाजपचीच रेवडी दिल्लीकरांना देऊ केली आहे. ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’अंतर्गत दरमहा लाभार्थी महिलांना १ हजार रु. दिले जाणार आहेत. दुसरी योजना वृद्धांसाठी असून त्याअंतर्गत खासगी रुग्णालयात मोफत उपचार केले जातील. या दोन्ही योजना म्हणजे हमखास जिंकून देणारी खेळी असल्याचा विश्वास ‘आप’ला वाटतो. कदाचित प्रमुख विरोधक भाजपलाही बहुधा तसेच वाटू लागले असावे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा