देशात राजस्थान आणि छत्तीसगड या दोनच राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत उरला आहे. त्यापैकी राजस्थानात पक्षांतर्गत गटबाजी कमालीची टोकाला गेली आहे. सचिन पायलट यांचे बंड फसल्याने अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार पडता पडता मागे वाचले होते. भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ या दिशेनेच सारी पावले पडावीत अशीच पक्षातील सद्य:स्थिती. मल्लिकार्जुन खरगे यांची काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यावरही काही फरक पडलेला नाही असेच चित्र राजस्थानमधील सचिन पायलट यांच्या ताज्या पवित्र्यावरून स्पष्ट होते. गेहलोत यांच्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही याचे शल्य सचिन पायलट यांना नक्कीच असणार. कारण गेल्या महिन्यात अगदी हातातोंडाशी आलेले मुख्यमंत्रीपद गेहलोत व त्यांच्या समर्थकांच्या बंडामुळे गेले. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान दौऱ्यावर आले होते. कोणत्याही विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्यातील सरकारी समारंभाला मोदी उपस्थित राहिल्यावर प्रेक्षकांमधून ‘मोदी, मोदी’ असा जयघोष करीत विरोधी मुख्यमंत्र्याला नामोहरम केले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा