‘मी संजय, महाभारतातला समालोचक. तसा मी राजा नसलो तरी कुणाशी बोलायचे व कुणाशी नाही हे ठरवत असतो. पण आता अगदीच नाईलाज झाल्याने मला तुझ्या स्वप्नात यावे लागले. तर सांगायचा मुद्दा असा की, अलीकडे तू जे काही बोलू (मी बरळू म्हणणार नाही) लागला आहेस त्यातून माझीच बदनामी होतेय असे मला तीव्रतेने वाटू लागले आहे. नामसाधर्म्यामुळे असेल पण हे योग्य नाही. सत्तेच्या विरुद्ध युद्ध लढतोय असा दावा रोज सकाळी तू करतोस. पण हे करताना तू असत्य व निराधार कल्पनांचा आधार का घेतोस? मी २१ दिवस चाललेल्या १८ औक्षिणीच्या युद्धात सहभागी झालो पण जे दिसले तेच धृतराष्ट्राला सांगितले. त्यामुळे मी त्यांचे डोळे होऊ शकलो. तू ही किमया कधी साधणार? तू तुझ्या पक्षाचा प्रवक्ता. तेव्हा तू पक्षातल्या घडामोडींची माहिती देणे व सत्ताधाऱ्यांनी काही चुकीचे केले तर त्यावर प्रहार करणे समजून घेता येईल. पण सत्ताधाऱ्यांच्या पक्षात काय चालले हे सांगण्याचा तुला अधिकार काय? विश्वप्रवक्ता समजायला लागलास की काय स्वत:ला? तुझ्या या कलागतीने त्यांच्यात भांडणे होतील असे तुला वाटते काय? मध्यंतरी तू वर्षा बंगल्यात हाडे पुरलीत. काळ्या जादूचे प्रयोग होणार असे काहीबाही बोलला. तुझा हाही फासा उलटा पडला. द्याुतात हाडांच्या कवळ्या घेऊन प्रतिस्पर्ध्यांना चीत करणारा शकुनीमामा कुठे व तू कुठे? कधी विचार केला का यावर? की नुसते तोंडाला येईल तेच बोलत सुटणार.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा