भाऊसाहेब आहेर
दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत ऊसतोड कामगार विविध राज्यांत स्थलांतर करतात. जवळजवळ सहा महिन्यांसाठी ते स्वत:चे गाव आणि कुटुंबापासून दूर राहतात. जिथे जातात तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था गावाबाहेरच असते. कधी ती स्मशानाजवळ तर कधी हागणदारीजवळही असते. वीज, पाणी, शाळा, दवाखाना अशा मूलभूत सोयीसुविधांसाठी या कामगारांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या आणि प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागते. पाण्याची कमतरता, पिण्याचे अशुद्ध पाणी, अस्वच्छ जागा, अत्याधिक शारीरिक श्रम, अपुरी विश्रांती, कामाचा ताण, अंधश्रद्धा, व्यसन आणि आरोग्यसेवा-सुविधांचा अभाव यामुळे या कामगारांमध्ये आजारांचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्या आरोग्याकडे फारसे कुणाचे लक्ष नसते. ऊसतोड कामगारांना ती गावे नवीन असतात. गावाबाहेर राहावे लागत असल्यामुळे दवाखाने जवळ नसतात. फडावरही आरोग्य कर्मचारी फारसे फिरकत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा