भारतीय संविधानसभेने सुमारे दोन वर्षे प्रत्येक अनुच्छेदाची चर्चा करीत नव्या भारतीय प्रजासत्ताकाच्या उभारणीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपला मसुदा २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी मंजूर केला. ही राज्यघटना २६ जानेवारी, १९५० रोजी प्रत्यक्ष अमलात आली. तिच्या आठव्या परिशिष्टात त्यावेळी १४ राज्यभाषा स्वीकृत करण्यात आल्या होत्या. आज त्यांची संख्या २२ झाली आहे. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार ती मान्य १४ भाषांत भाषांतरित होणे अनिवार्य होते. तेरा भाषांना भाषांतरकार मिळाले; पण संस्कृत भाषेतील घटना भाषांतरास सुयोग्य भाषांतरकार लोकसभा सचिवालयास मिळेना. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि लोकसभा सभापती ग. वा. तथा दादासाहेब मावळणकर हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा संस्कृत व्यासंग जाणून होते. मावळणकर भारतीय राज्यघटनेच्या संस्कृत भाषांतराची जबाबदारी आणि जोखीम ओळखून होते. त्यांनी महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या अध्यक्षतेखाली संस्कृत भाषांतरकारांची समिती स्थापून, तिचे निमंत्रक म्हणून तर्कतीर्थांची नियुक्ती केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा