मानवेंद्रनाथ रॉय हे क्रांतिकारक कम्युनिस्ट म्हणून जगात ओळखले जातात. रशियातील स्टॅलिनशी मतभेद झाल्यानंतर ते १९३० मध्ये भारतात परतले ते वेषांतर आणि नामांतर करून. भारतात डॉ. महमूद या नावाने त्यांनी प्रवेश केला. ते इथे येऊन क्रांती करू इच्छित होते. त्यावेळी भारतात स्वातंत्र्य चळवळ प्रभावी होती आणि तिचे नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेसकडे होते. काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन ते सक्रिय होत होते; पण तेवढ्यात ब्रिटिश पोलिसांना संशय आल्याने ते पकडले गेले. २१ जून, १९३१ रोजी पकडले गेलेले डॉ. महमूद हे मानवेंद्रनाथ रॉयच होते, याची खात्री होताच कानपूर खून खटल्याचे आरोपी क्रमांक एक म्हणून त्यांच्यावर खटला दाखल केला. त्यात त्यांना १२ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पुढे पुनर्विचार याचिकेनंतर ती सहा वर्षे झाली. त्यानुसार ते १९३६ मध्ये तुरुंगातून बाहेर आले व राजकारणात सक्रिय झाले. २७ व २८ डिसेंबर १९३७ च्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनातील मानवेंद्रनाथ रॉय यांचे भाषण प्रभावी ठरले. महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी, बुद्धिजीवी त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याबरोबरीने वसंतराव कर्णिक, द्वा. भ. कर्णिक, न्यायमूर्ती व्ही. एम. तारकुंडे, प्रा अ. भि. शहा, प्रा. गोवर्धन पारीख, यशवंतराव चव्हाण, भाई बेके, वामनराव कुलकर्णी, बा. रं. सुंठणकर, वा. रा. जवाहरे प्रभृती मान्यवरांचा अंतर्भाव होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा