चीनच्या झिंजियांग प्रांतातील काश्गर हे मोठे शहर आहे. किरगिझस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा त्यापासून जवळ आहेत. काश्गर आणि इस्लामाबाद काराकोरम हायवेने जोडले आहेत. तोच रस्ता पुढे पाकिस्तानच्या ग्वादार बंदरापर्यंत जातो. चीनच्या बेल्ट अँड रोड या भव्य आणि वादग्रस्त उपक्रमाचा तो भाग आहे. भारताच्या सीमेपासूनही तो लांब नाही. काश्गर येथे आपला दूतावास होता. ५०च्या दशकात जेव्हा कम्युनिस्ट चीनने झिंजियांग व्यापले तेव्हा तेथील दूतावास गुंडाळण्याचा आदेश भारताला देण्यात आला. जो दूतावास ब्रिटिश परंपरा सांगतो त्याची येथे गरज नाही असे भारताला सांगण्यात आले. हा दूतावास म्हणजे त्या प्रांतात डोकावण्याची खिडकी होती. त्यानंतर चिनी सरकारने झिंजियांगमधून तिबेटपर्यंतचा रस्ता बांधण्यास सुरुवात केली. त्यातूनच पुढे संघर्ष उद्भवला. खरे तर भारतातून बौद्ध भिक्खू आणि व्यापारी तांडे अनेक शतके या मार्गावरून काश्गर आणि तिथून पुढे मध्य आशियात जात-येत होते. हा मार्ग बंद झाल्याने भारताचा या प्रदेशातील प्रभाव संपला. मूलत: काश्मिरी असलेला बौद्ध प्रकांड पंडित आणि भाषांतरकार कुमारजीव या प्रदेशात वाढला. परंपरा नाकारून आम्ही नवाच भारत घडवू असे धोरण ठेवल्याने काय नुकसान होते हे या प्रकरणावरून ध्यानात येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा