चंडीगड महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या तमाशाचे वर्णन लोकशाहीला काळिमा असेच करावे लागेल. चंडीगडचा हा प्रघात पडल्यास भविष्यात देशातील निवडणूक व्यवस्थाच निकालात निघण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. केंद्रशासित असलेल्या चंडीगड महानगरपालिकेची सदस्यसंख्या ३६ असून भाजपचे १६, आम आदमी पार्टीचे १३, काँग्रेसचे ७ तर शिरोमणी अकाली दलाचा एक असे संख्याबळ आहे. थोडक्यात कोणाकडेच बहुमत नाही. इंडिया आघाडीचे घटक पक्ष ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र आल्याने त्या दोघांचे संख्याबळ २० झाले. त्यामुळे ‘आप’चा महापौर निवडून येणार ही केवळ औपचारिकता होती. पण लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत कोणतीही निवडणूक काहीही करून जिंकायचीच असा भाजपचा पक्का निर्धार असतो. भाजपला मतदारांचा कौल असल्यास याबद्दल तक्रार करण्याचे कारण नाही. पण चंडीगडमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सारी निवडणूक प्रक्रियाच गुंडाळून ठेवण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा