‘मलाही भावांप्रमाणेच देशकार्य करायचे आहे’ अशा हट्टापायी विमला नौटियाल कौसानीच्या आश्रमात गेल्या. वय १७ आणि सन १९४७- त्या वेळी, या वयात मुलींची लग्ने होत. पण मी देशासाठीच काम करणार अशा ईर्षेने विमला ‘लक्ष्मी आश्रमा’त आल्या. हा आश्रम ‘सरला बहन’ यांनी- म्हणजे गांधीजींना साथ देण्यासाठी ब्रिटन सोडून भारतात आलेल्या कॅथरीन मेरी हायलेमान यांनी – स्थापला होता. ‘नयी तालीम’नुसार तिथे स्वावलंबन, सूतकताई, ग्रामोद्धार, व्यसनमुक्ती हे कार्य चाले. ते त्यांनी सहा वर्षे केले आणि १९५३ ते ५४ हे अख्खे वर्ष विनोबा भावे यांच्या ‘भूदान’ चळवळीसाठी सरलाबेनसह समर्पित केले. २० ते २५ वयाच्या इतरजणी पोराबाळांमध्ये आणि ‘रांधा, वाढा…’ च्या चक्रात अडकत असताना विमला मात्र खेड्यांना आत्मविश्वास आणि नैतिक बळ देण्याचे काम करत होत्या. आश्रमात शिकवूही लागल्या होत्या. या कामाचे महत्त्व त्यांना इतके पटले होते की होणाऱ्या नवऱ्याला त्यांनी अटच घातली- राजकारण सोडा- इथेच गावात राहा. पोटापुरते कमावून आपण दोघेही सर्वोदयाचे काम करू.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा