आयुष्यभर निरलस वृत्तीने समाजासाठी झटणारी माणसे दुर्मीळ होत चालली असताना डॉ. भाऊसाहेब झिटे यांचे जाणे खिन्न करणारे ठरले. शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे आव्हानांची मालिका त्यांच्या पाचवीलाच पुजली होती. तरी आपल्या कृतिशील कार्याने आणि सर्वजण हिताय दृष्टिकोनातून त्यांनी या सर्व आव्हानांवर मात करीत मानवतेचा एक नवीन आदर्श उभा केला. असाध्य आजाराने आपल्याला गाठलेय हे कळताच मनुष्य निराश होतो, व्याधी चहूबाजूंनी आपला विळखा घट्ट करीत असताना जवळचे नातेवाईकही जवळ येऊ इच्छित नाहीत. अशा स्थितीत उरल्यासुरल्या जगण्यावरचा विश्वास आणखी ढासळतो. नेमक्या याच क्षणी नि:स्वार्थ सेवाभावाने त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे हाच खरा मानवतावाद आहे, यावर झिटे यांचा अपार विश्वास होता. झिटे यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पाचगावचा. वध्र्याच्या न्यू इंग्लिश हायस्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तरुण वयातच झालेल्या क्षयरोगाच्या उपचारासाठी ते नागपूरच्या डॉ. गुमास्तांकडे दाखल झाले. उपचारानंतर तेथेच काम करू लागले. नि:स्वार्थी सेवाभाव हा त्यांच्या वृत्तीचा स्थायिभाव असल्यामुळे त्यांनी विद्वत्रत्न डॉ. भाऊजी दप्तरी यांनी स्थापन केलेल्या नागपूरच्या होमिओपॅथिक महाविद्यालयातून डीएचबी ही पदवी १९५६ मध्ये घेतली आणि त्यानंतर दाभा येथील ओसाड माळरानावर ‘आंतरभारती आश्रमा’ची मुहूर्तमेढ रोवली. सेवा, शिस्त आणि नैतिक आचरण हेच त्यांच्या या आश्रमाचे खरे भांडवल होते. म्हणूनच आश्रमात आचार्य दादा धर्माधिकारी व यदुनाथ थत्तेंसारखी माणसे अखेरच्या काळात येऊन राहिली. महात्मा गांधी निसर्गोपचाराचे उपासक होते. ते नेहमी म्हणत की, निसर्गोपचार हा कमी खर्चात प्रत्येक भारतीय बांधवाला सुदृढ व निरोगी बनवेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा