‘भाऊ इंजिनीअर- तो अमेरिकेत असतो, एक बहीण डॉक्टर, दुसरी बहीण प्राध्यापक आहे.. आणि मी आयएएस व्हावं अशी वडिलांची इच्छा होती. झालेही असते कदाचित, पण ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त गेल्यावर पक्कं ठरवलं- नाटय़ क्षेत्रातच राहायचं.’ – हे मुलाखतीत अगदी सहजपणे सांगणाऱ्या त्रिपुरारी शर्मा खरोखरच आयएएस झाल्या असत्या, तर प्रशासनातही त्यांनी छाप उमटवली असती इतके नेतृत्वगुण त्यांनी नाटय़ क्षेत्रात सिद्ध केले. ‘हजार चौरासी की माँ’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या संवादलेखिका आणि ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ (२०१३) मिळवणाऱ्या नाटय़ लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री आणि राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातील अध्यापक अशी ओळख त्यांनी मिळवली. स्त्रीवादी नाटकांचा भारतीय इतिहास त्यांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही, इतके त्यांचे कर्तृत्व. सामाजिक आशयाचा आग्रह नुसता बोलून न दाखवता, कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या तरुणांच्या कोळपत्या आशा-आकांक्षांवरले ‘आधा चाँद’सारखे नाटक (२०१२) प्रेक्षकांपुढे आणत राहिल्या. त्यांची ही धडपड आधी दुर्धर आजाराने थांबवली, आणि १ ऑक्टोबर रोजी मृत्यूने.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा