युद्धं ही भूकंपासारखी असतात. पृथ्वीच्या अंतरंगात भूपट्टांची हालचाल होऊन तणाव निर्माण होतो आणि एका मर्यादेनंतर या तणावाचा उद्रेक भूकंप, ज्वालामुखी अशा स्वरूपात दिसतो. जीवित आणि वित्तहानीच्या पलीकडे या भौगोलिक घडामोडींचा दूरगामी परिणाम म्हणजे त्यांनी भूपृष्ठावर घडवलेले बदल आणि नवीन भूरूपांची निर्मिती…काही विध्वंसक तर काही निर्मितीशील! युद्धांचंही असंच काहीसं… आधी राष्ट्रा-राष्ट्रांतले ताणतणाव वाढीस लागतात… संघर्ष इरेला पेटतो… जीवित आणि वित्तहानी होते… मात्र त्यापुढे युद्धांची सर्जनशील भूमिका असते ती युद्धोत्तर घडी बसविण्याची… युद्ध लढण्यासाठी आणि रोखण्यासाठी नवनवीन शोधांचं उगमस्थान बनण्याची. मागील शतकाचा पूर्वार्ध हा दोन महायुद्धांच्या मंथनाचा साक्षीदार. त्यातून तंत्ररूपी विश्वव्यापी अमृत प्रकटलं आणि सर्वच राष्ट्रे या तंत्र-प्राशनाच्या स्पर्धेत उतरली. या स्पर्धेने अनेक वळणं, कोलांट्याउड्या घेत तर कधी राजमार्ग बांधत आधुनिक जागतिक व्यवस्थेची घडी बसवली. अर्ध्या शतकाचा हा समरशंख राजकीय महत्त्वाकांक्षेनं फुंकला गेला तर आण्विक तंत्रज्ञानाच्या आविष्काराने विझला… तो आजतागायत!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा