‘द केरल स्टोरी’ या चित्रपटावर पश्चिम बंगाल सरकारने घातलेली बंदी, तमिळनाडूतील मल्टिप्लेक्स संघटनेने हा चित्रपट न दाखवण्याचा घेतलेला निर्णय, केरळ आणि तमिळनाडूच्या उच्च न्यायालयांनी बंदीची मागणी नाकारणे आणि यापैकी तमिळनाडू उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात मिळालेले आव्हान.. अशा वेगवान घडामोडींनंतर बुधवारी, पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाविरुद्ध या चित्रपटाच्या निर्मात्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेण्यास महत्त्व आहे. म्हणजे सर्वोच्च न्यायालयासमोर आता याच चित्रपटाविषयीच्या दोन याचिका आहेत : पहिली हा चित्रपट बंदीमुक्त ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी- तिची सुनावणी १५ मेपासून सुरू होणार आहे. तर दुसरी पश्चिम बंगालने लादलेल्या बंदीचा विरोध करणारी- तिची सुनावणी ‘निर्मात्यांचे आर्थिक नुकसान होते आहे’ हा मुद्दा ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी मांडल्यामुळे आता १२ मेपासून सुरू होणार आहे. मात्र म्हणून १२ मे रोजीच सोक्षमोक्ष लागेल असे नाही. न्यायालय योग्य वेळी निर्णय देईल आणि तो योग्यच असेल. पण ‘केरल स्टोरी’सारख्या आणखी एका प्रचारपटामुळे काय परिणाम होणार आहेत, हे काही फक्त न्यायालयात ठरवले जाऊ शकत नाही. तो विषय व्यापक चर्चेचा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा