अवघ्या २१ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू होऊनही सरकारी पातळीवर असलेली कमालीची शांतता संतापजनक आहे. या ११ वाघांमध्ये पाच बछडे होते. एवढ्या कोवळ्या वयात या जंगलाच्या राजपुत्रांना जीव गमवावा लागणे नुसते वेदनादायी नाही तर वनखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे. गेल्या दोन दशकांत राज्यात वाघांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. यावरून स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारने त्यांच्या रक्षणाची काळजी वाहण्याऐवजी पर्यटनाला प्राधान्य दिले. व्याघ्रदर्शनाच्या नावावर बक्कळ पैसा कमावणाऱ्या खात्याने वाघांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी केलेले प्रयत्न किती तोकडे आहेत हेच त्यांचे हे मृत्यू दाखवून देतात. साधारणपणे डिसेंबर व जानेवारीत होणाऱ्या या वाढत्या वाघमृत्यूंमागची कारणेही यंत्रणेला ठाऊक आहेत. जून, जुलै हा वाघांच्या प्रजननाचा काळ. या काळात जन्माला आलेले बछडे १७ ते २४ महिन्यानंतर स्वत:चा अधिवास शोधण्यासाठी बाहेर पडतात. म्हणजे जन्मानंतरच्या दुसऱ्या वर्षी याच काळात. जंगल कमी व वाघ जास्त अशी स्थिती असल्यामुळे त्यांना दूरवर प्रवास करावा लागतो. नेमका तिथेच घात होतो हे दरवर्षीचे निरीक्षण. त्यामुळे या काळात पाच ते सहा वाघांचा मृत्यू ही सामान्य बाब समजली जाते. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे यंदाच्या या सलगच्या मृत्यूसत्राने दाखवून दिले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा