जम्मू-काश्मीरची निवडणूक आणि निकाल दोन्ही गुंतागुंतीचे आहे. तिथले भाजपचे राजकारण आणि निवडणुकीचे डावपेच यांचा संबंध हरियाणा वा महाराष्ट्र-झारखंडमधील निवडणुकीशी जोडता येत नाही. हरियाणाच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. मतदानोत्तर चाचण्यांच्या अनुमानानुसार हरियाणामध्ये भाजपचा पराभव होऊ शकतो. महाराष्ट्रातही भाजपप्रणीत महायुती जर पराभूत झाली तर भाजपअंतर्गत परिणाम काय होऊ शकतील, याचा विचार बहुधा भाजपचे नेते आत्तापासूनच करू लागले असतील. लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप अडीचशे जागाही गाठू शकली नाही, त्याचे उघडपणे नसले तरी खापर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फोडले जात आहे. आगामी काळात हरियाणाच नव्हे तर, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली नंतर बिहार ही राज्येदेखील भाजपने गमावली तर त्याची जबाबदारी कोणावर टाकली जाईल? हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदींना पर्याय शोधू लागला आहे का, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये का होईना होऊ लागली आहे. या चर्चांमधून मोदींच्या राजकीय अस्तित्वावरच शंका उपस्थित केली जात आहे. बिहारची विधानसभा निवडणूक पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. तोपर्यंत भाजपमध्ये नव्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वत:चे बस्तान बसवलेले असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा