ज्या केदारनाथकडे पायी चालत जाणेही कठीण असते तेथे मोठमोठाली हॉटेल्स, दुकाने तसेच टपऱ्या बांधून आपण एकप्रकारे निसर्गावर दडपण आणत आहोत. या धार्मिक स्थळांना भेटी देण्यामागे खरेच कोणती भावना असते. नुकतेच मकरसंक्रातीच्या वेळी कुंभमेळ्याच्या निमित्ताने अलाहाबाद रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन अनेक भाविक(?) मृत्युमुखी पडले. ५/६ वर्षांपूर्वी वाईजवळ काळुबाईच्या दर्शनाला आलेले शेकडो भाविक पायऱ्यांवरून घसरून मृत्यू पावले. या ठिकाणी अपघात झाल्यावर वर चढून जाण्यास खुद्द साताऱ्याच्या जिल्हाधिकारींना ३/४ तास लागले, कारण संपूर्ण रस्ता आडव्यातिडव्या रीतीने उभ्या केलेल्या वाहनांमुळे अडविला गेला होता. एवढे भाविक एकाच वेळी का जमा होतात? त्यामागे ‘श्रद्धा’ किती व दिखाऊपणा किती? एक गेला म्हणून दुसरा गेला. देवाधर्माला जाणे म्हणजे केवळ खोटय़ा प्रतिष्ठेचे लक्षण आहे? ‘साई भंडारा’चे वाढते प्रस्थदेखील चिंताजनक नव्हे काय? हा धार्मिक उन्माद नव्हे काय? व असे हे धार्मिक स्तोम कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार? निसर्ग आपत्ती एकवेळ परवडेल, पण हा धर्माच्या नावाखाली होणारा गोंधळ लवकरच आवरता घेतला पाहिजे.
शरद वर्तक, चेंबूर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा