दही-दूध चोरीच्या लीला कृष्णाने बाल्यावस्थेत केल्याने त्या शोभून दिसल्या आणि त्याची विविध रसभरीत वर्णने आजही भाविक ऐकतात. परंतु श्रीकृष्णाने पुढील कालखंडात भगवद्गीतेतून विश्वाला दिव्य संदेश दिला याचा मात्र विसर पडत आहे. वास्तविक उंच हंडी व जास्तीत जास्त थरांचा हट्ट धरणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी या वयात गीताजयंतीचे महत्त्व ओळखून व समजावून घेणे योग्य ठरेल, किंबहुना त्यांच्या वयास ते निश्चितपणे अधिक शोभून दिसेल.
दहीहंडी हा पारंपरिक उत्सव म्हणावा तर ज्या मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला तेथेही दहीहंडी हा प्रकार आढळत नाही. असे असताना महाराष्ट्र शासनाने दहीहंडीबाबत न्यायालयात पुन्र्वचिार याचिका दाखल करावी याचा खेद वाटतो. आज राज्यभरात पुरेशा पर्जन्यवृष्टीअभावी दुष्काळी संकट येऊ पाहत आहे. सामाजिक गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. डॉ. दाभोलकरांचे खुनी मोकळेपणे फिरत आहेत. अशा गंभीर परिस्थितीतून राज्य जात असताना केवळ एका नेत्याचा ‘बालहट्ट’ पुरवण्यासाठी शासनाने कसलेही जनहित न साधणारी याचिका न्यायालयात तत्परतेने दाखल करून आपली असंवेदनशीलता दाखवली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा