विधिमंडळाच्या आवारात पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करून संबंधित आमदारांनी निवडून आलेल्या भागातील जनतेचा पराभवच केला आहे. या घटना घडतातच कशा, या प्रश्नाचे उत्तर फक्त ‘आमदारांना सत्तेचा माज चढल्यामुळे’ असेच द्यावे लागणार! आम्ही पुढली पाच वर्षे काहीही करू शकतो, कुणी आमचे काहीही वाकडे करू शकत नाही, ही त्यांची भावना. एखादा अधिकारी काम करत नसेल तर हीच मंडळी केवढा गदारोळ करतात.. सध्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास उडालेला आहे, त्यात ही आणखी भर.
किरण बेदी गोव्यात पोलीस अधिकारी असताना त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीवर (चुकीच्या पार्किंगमुळे) कारवाई केली तेव्हा इंदिराजींनी बेदी यांचे कौतुकच केले होते आणि त्याच प्रसंगातून किरण यांना ‘क्रेन बेदी’ म्हणू लागले, हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. परवाच माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांनी भारतीय लोकशाहीला दहापकी पाच मार्क देऊन काठावर पास असल्याचे म्हटले, याची इतक्या लवकर आठवण यावी हा निव्वळ योगायोग!
– अमित लोखंडे, महिम्नगड, सातारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा