गेली काही वष्रे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचे समर्थक व विरोधक यांच्यात एक निर्थक चर्चा सुरू आहे ती म्हणजे या यंत्रात घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जातात. मतदान यंत्रावर सगळे खापर फोडण्याच्या कोत्या मनोवृत्तीच्या खेळात आपण लोकशाहीला किती नुकसान पोहोचवत आहोत याचा विचार पहिल्यांदा भाजपने व हल्ली विरोधकांनी केलाच नसेल. २०१४ मधील निवडणुकांच्या आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे असतानाही आम्ही निवडणुका जिंकलो होतो हे काँग्रेस व समाजवादी पक्ष आता सांगत नाहीत. आम आदमी पक्षाचा हिशेब सोपा आहे, जेव्हा ते निवडणूक जिंकतात तेव्हा त्यांच्या मते निवडणूक आयोग व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे सगळे ठीक असते व जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा मात्र मतदान यंत्रात त्यांना गडबड वाटू लागते. भाजपच्या मते २००९ मध्ये मतदान यंत्रात घोटाळा होता, पण आता त्यांच्या मते यंत्रे सुधारली आहेत. ‘निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला पाहिजे’ असा मुद्दा भाजप आता मांडत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ‘जेम्स मायकेल िलगदोह’ यांचा संपूर्ण नामोल्लेख करून त्यांच्यावर दोषारोप करणारे पहिले राजकीय नेते नरेंद्र मोदीच होते, ही गोष्ट टीव्हीचे वृत्तनिवेदक तर विसरून गेले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा