तिहेरी तलाकवर बंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माझे मन आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर झुलत राहिले. तिहेरी तलाकची प्रथा ही मानवता, राज्यघटना व इस्लाम धर्म या तिन्हींच्या विरोधात आहे. त्यामुळे जेव्हा हा निकाल लागणार होता तेव्हा सकाळपासून असे वाटत होते की, सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाक तर बंद करावाच, पण त्यात व्यापक सामाजिक व राजकीय सुधारणांचे महाद्वारही उघडून द्यावे. सुरुवातीला न्यायालयाने हा प्रश्न पुन्हा संसदेच्या बाजूला टोलवला आहे अशी बातमी आली तेव्हा मन खट्टू होत गेले, पण काही मिनिटांनीच सरन्यायाधीश केहर व न्या. नजीर यांचे तलाकला अनुकूल असलेले मत हे अल्पमत आहे व बाकी तीन न्यायाधीशांनी तिहेरी तलाकला बेकायदा ठरवले आहे असे सगळे चित्र स्पष्ट झाले. मग मात्र दिलासा मिळाला. जेव्हा सगळा निकाल मी वाचला तेव्हा उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न मनात उभे राहिले, पण एक छोटीशी आशा मात्र कायम राहिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा