तामिळनाडूत सध्या गेल्या १४० वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ पडला आहे, पण त्याची कुणालाच काळजी व फिकीर नाही. मोठी मतपेढी असलेल्या लोकांशी असा दुजाभाव सरकारे कसा ठेवू शकतात? आपण राष्ट्रवादाच्या फुकाच्या गप्पा करतो, पण तामीळ शेतक ऱ्यांच्या समस्येवेळी तो राष्ट्रवाद त्यांच्या वेदना का समजून घेऊ शकत नाही हे मला पडलेले साधे प्रश्न आहेत. गेल्या आठवडय़ात आम्ही तामिळनाडूतील सात सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्य़ांचा दौरा केला. तामिळनाडूला परतीच्या मान्सूनचा किंवा ईशान्य मान्सूनचा पाऊस ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मिळत असतो; पण २०१६ मध्ये या पावसानेही पाठ फिरवली. अधिकृत आकडेवारीनुसार ईशान्य मान्सूनचा हा पाऊस सरासरीच्या ६२ टक्क्यांनी कमी पडला. पावसाची कमतरता २५ टक्के असेल तरी ती गंभीर मानली जाते व पन्नास टक्के असेल तर जास्त धोक्याची मानली जाते. गेल्या वेळी राज्याने पावसाचा नीचांक पाहिला. १८७६ नंतर इतका कमी पाऊस तामिळनाडूत कधी पडला नव्हता. राज्यातील धरणांमध्ये आता केवळ २० टक्केपाणी आहे. एकूण ३२ जिल्ह्य़ांपैकी २१ जिल्ह्य़ांना दुष्काळाचा फटका बसला आहे, त्यात भाताचे कोठार असलेल्या कावेरी त्रिभुज प्रदेशाला सर्वाधिक झळ बसली आहे, असे आम्हाला या दौऱ्यात जाणवले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा