‘येथे एक गाव होते’ हा वृत्तान्त वाचला (लोकसत्ता, ३१ जुलै), टीव्हीवर याची भीषणताही पाहिली. पण यातून आपण काही शिकणार आहोत का? काही वर्षांपूर्वी किल्लारी हे मराठवाडय़ातील गाव भूकंपाने उद्ध्वस्त झाले होते; आता माळीण गाव, भूस्खलनाने. मृतांच्या नातेवाइकांना दोन/पाच लाख रुपये नुकसानभरपाई आणि श्रद्धांजली इथेच आपण नेहमीप्रमाणे थांबणार आहोत का?
आपत्ती व्यवस्थापन हा विषय आता अभ्यासक्रमात आला आहे, पण आपल्या जगण्यात कधी येणार? या सरकारला आपल्या मंत्रालयातील आगही आटोक्यात आणता येत नाही, ते डोंगर वस्त्यांवर हा पाठ कसा गिरवणार? पावसामुळे धोकादायक झालेली घरे, गावे, नदीपात्राजवळ, डोंगराजवळ असलेल्या सर्व वस्त्यांचे सर्वेक्षण युद्ध पातळीवर सरकारने हाती घ्यावे आणि त्यावर उपाययोजना करावी; तरच हा महाराष्ट्र जगेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा