‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाच्या निर्मात्यांमध्ये वाद उद्भवल्याचे वृत्त (लोकसत्ता, ९ फेब्रु.) वाचले. हे नाटक ज्या उद्देशाने रंगमंचावर आलेले आहे तो बघता हा वाद वेदनादायक आहे. ‘सृजन’ या अनियतकालिकाच्या दिवाळी अंकात नंदू माधव, संभाजी भगत, राजकुमार तांगडे, कैलाश वाघमारे, प्रवीण डािळबकर यांच्यासह राहुल भंडारे आणि युवराज मोहिते यांची या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दलची मते व्यक्त झालेली आहेत. त्या पाश्र्वभूमीवर हा वाद केवळ आíथक कारणांतून किंवा श्रेयासाठीच्या खोटय़ा संकल्पनांतून उद्भवलेला आहे. या नाटकाचा निर्माता कोण किंवा इतर बाबींपेक्षा या नाटकातून जो विचार मांडला जातोय तो आजघडीला अत्यंत महत्त्वाचा आहे. या नाटकाच्या यशाचे खरे श्रेय निर्माता-दिग्दर्शकांपेक्षा नाटकाची मूळ संकल्पना ज्यांची आहे त्या संभाजी भगत, लेखक राजकुमार तांगडे आणि त्यातील ग्रामीण भागातील शेतकरी कलावंतांचेच आहे हे विसरता कामा नये.
तेव्हा भीमनगर मोहल्ल्यात अंडरग्राऊंड असलेले हे निर्थक वाद नाटकाशी संबधित असलेल्यांनी गाडून टाकून नाटकाचा विद्रोही आशय समकालीन समाजाच्या गळी उतरवणे आणि तो पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले तर फार बरे होईल.
या नाटकाचं व्यावसायिक यश हे या नाटकाच्या निर्माता-दिग्दर्शकांना अनपेक्षित असावं. आता हे नाटक व्यावसायिक आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वी ठरत आहे. या नाटकामुळे काही वाद निर्माण होतील अशी भीती संबंधितांना सुरुवातीला वाटत असावी ती आता नाटकाच्या यशस्वितेनंतर दूर झाली असावी आणि त्यामुळे आता हे असले क्षुल्लक वाद निर्माण होत असावेत. व्यवहार थोडासा बाजूला ठेऊन संबंधितांनी हे नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावं हीच अपेक्षा.
अरिवद सुरवाडे, उल्हासनगर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा