कोणताही एक प्रदेश, राज्य वा देश हा गुन्हेगारीमुक्त असूच शकत नाही. माणसे आहेत तेथे गुन्हा आलाच. यातील प्रत्येकास पोलिसांनी संरक्षण द्यावे ही अपेक्षाही अयोग्य. हे वास्तव मान्य केले की पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्काराबद्दल सरकारला बोल लावता येणार नाही. सरकारला दोष द्यायला हवा तो गुन्हेगारांस अभयारण्यसदृश सुरक्षित वातावरण या राज्यात निर्माण होऊ दिल्याबद्दल. पुण्यातील या बलात्कार घटनेच्या आसपास शहराच्या काही भागात लागलेले फलक या अभयारण्याचे सूतोवाच करतात. आमच्या भागाचे रूपांतर ‘बीड’मध्ये होण्यापासून वाचवा, अशी हाक एकेकाळी ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणवून घेणाऱ्या, ज्ञानमार्गी ज्ञानकेंद्री उद्याोगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरातील नागरिकांस द्यावी लागत असेल तर त्यातून या अभयारण्याची चाहूल लागते. आणि हे सारे पुण्यात. तिकडे मराठवाड्यात जे काही सुरू आहे त्यास अद्यापही अंत नाही. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशकातील गुंड हे या सगळ्यांपेक्षा अधिक शहाणे. त्यांनी राजकारण्यांची मदत घेण्याऐवजी स्वत:च राजकारणी बनण्यास प्राधान्य दिले आणि गुंडांची एकमेकांस बघून घेईन ही भाषा राजकारणात आणली. विदर्भाची परिस्थिती काही वेगळी नाही. कोकणात उद्याच्या महाराष्ट्राचे ‘हिंदुहृदयसम्राट’ बनू पाहणारे किती मोकाट सुटलेले आहेत ते सगळ्या महाराष्ट्रासमोर आहेच. तेथील मालवणात नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका १५ वर्षांच्या मुलाने कथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या तक्रारीवर जे काही घडले ते कायद्याचे राज्य संकल्पनेशी फारकत घेणारे नाही, असे म्हणता येणे अवघड. ही सर्व परिस्थिती काय दर्शवते?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा