लोकसभा निवडणुकीत आश्वासक कामगिरी नोंदवल्यापासून राहुल गांधी यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला आहे, हे खरे. संसदेतील त्यांची उपस्थिती, महत्त्वाच्या विषयांवर भाषणे, राजकीय पुढाकार इत्यादी आघाड्यांवरही त्यांच्यात लक्षणीय बदल झाला आहे हे सत्ताधारी भाजपही नाकारणार नाही. किंबहुना या बदलामुळेच अनेकदा भाजपची चिडचिड होताना दिसते आणि उत्साहित राहुल गांधी यांस आवरावे कसे या विवंचनेने त्या पक्षातील अनेक नेते अस्वस्थ दिसतात. राहुल गांधी यांच्या हालचालीत ‘चैतन्य’ दिसू लागलेले आहे, असे म्हणता येईल. परंतु म्हणून त्यांनी विवेकास रजा देण्याचे कारण नाही. अर्थसंकल्पावरील चर्चेस सुरुवात करताना राहुल गांधी यांस विवेकाची साथ होती, असे म्हणता येणार नाही. अर्थसंकल्पीय प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा संदर्भ देत या अधिकाऱ्यांत ‘ओबीसी, दलित’ कोणी नाही असे उद्गार त्यांनी काढले. त्यास प्रत्युत्तर देताना माजी माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री, वाचाळ अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता ‘ज्यांना स्वत:ची जात माहीत नाही…’ असे अत्यंत वाह्यात विधान केले. कहर आणि आपली सामाजिक दिवाळखोरी अशी की या भाषणासाठी ठाकूर यांच्या पाठीवर साक्षात पंतप्रधानांची कौतुकाची थाप पडली, यास काय म्हणावे? राहुल यांच्या अविवेकावर भाष्य करायला जावे तर सत्ताधारी नंतर त्याहीपेक्षा अधिक महा-अविवेकाचे दर्शन घडवतात हे सध्या आपल्या राजकीय/ सामाजिक जीवनाचा स्तर किती घसरलेला आहे हे दाखवून देते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा