ममता बॅनर्जी यांचे आडमुठे राजकारण जगजाहीर आहे. संयम, सहिष्णुता, उदारमतवाद आदी गुणांचा आणि ममतादीदींचा फारसा ऋणानुबंध नाही. काही आठवड्यांपूर्वी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील रुग्णालयातील महिला डॉक्टरवर झालेला लैंगिक अत्याचार, तिची हत्या आणि नंतर त्या प्रकरणाची हाताळणी या मुद्द्यांवर दीदींविषयी बरे बोलावे असे काही नाही. त्याबाबत राष्ट्रीय पातळीवर क्षोभ निर्माण झाला आणि ते रास्तच होते. या प्रकरणात पुरती नाचक्की झाल्यानंतर दीदींनी महिलांवरील अत्याचार कसे रोखावेत यावर चर्चा करणारी दोन पत्रे पंतप्रधानांस लिहिली. ते वरातीमागून घोडे हाकण्यासारखे होते. राज्याच्या मुख्यमंत्री या नात्याने स्वत: जे काही करणे अपेक्षित आहे ते करावयाचे नाही, त्याबाबतच्या सल्लासूचनांबाबत हट्टीपणा करायचा आणि नंतर फारच आरडाओरड झाल्यावर इतरांच्या नावे बोटे मोडायची असे त्यांनी अनेकदा केलेले आहे. या वेळी त्याचा जास्त बभ्रा झाला. कारण प्रश्न महिलांची इभ्रत, इज्जत आणि महिला मुख्यमंत्र्याचे इमान या मुद्द्यांचा होता. इतके करूनही हे प्रकरण शांत होत नाही हे पाहिल्यावर त्यांच्या सरकारने महिलांवरील अत्याचार यापुढे कसे हाताळले जातील याबाबत नवा ‘कायदा’ केला. त्याची दखल घेणे आवश्यक. याची प्रमुख कारणे तीन. राजकीय, वैधानिक आणि असे अन्य कायदे. प्रथम राजकीय मुद्द्याविषयी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा