प्रिय आर्यन खान, तू जिचा प्रतिनिधी आहेस त्या तरुण पिढीला पत्रे लिहिण्यातला किंवा पत्रे येण्यातला आनंद माहीत नसेल. अगदी अलीकडेपर्यंत आपल्याकडे एक काळ असा होता जेव्हा पत्रे हा आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी संपर्कात राहण्याचा, प्रख्यात व्यक्तींशी संपर्क साधायचा, अनोळखी लोकांशी वैचारिक देवाणघेवाण करायचा महत्त्वाचा मार्ग होता. सामाजिक विरेचनाचे अर्थात भावभावनांना वाट मोकळी करून देण्याचे ते एक महत्त्वाचे माध्यम होते. गेल्या काही दिवसांपासून, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी घातले गेलेले केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) छापे पाहताना एक सेवारत पोलीस अधिकारी म्हणून माझ्या मनात काही विचार येत होते. मीदेखील तुझ्याच वयाच्या दोन तरुण मुलांचा बाप आहे. तू आणि तुझ्या आईवडिलांनी ऑक्टोबर २०२१ मधल्या त्या अमली पदार्थांच्या प्रकरणात जे काही सहन केलं, त्याबद्दल मला जे काही वाटलं त्या भावनांना या पत्राच्या माध्यमातून वाट मोकळी करून द्यावी असे वाटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा