‘आयुष्मान भारत’ योजना २०१८ पासून सुरू झाली. या योजनेचा पहिला भाग म्हणजे रुग्णालयातील काही उपचारांसाठीची सरकारी पैशांतून चालणारी ‘पी.एम.जे.वाय’ ही आरोग्य-विमा योजना. (दुसऱ्या भागाकडे नंतर वळू.) १२ कोटी गरीब कुटुंबांतील ६० कोटी व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यात आता ७० वर्षांवरील सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. या विम्याच्या लाभार्थ्यांपैकी प्रत्येक कुटुंबाला एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी इत्यादींपैकी ठरावीक १३९९ प्रोसिजर्ससाठी वर्षाला पाच लाख रुपयांचे आरोग्य-विम्याचे कवच आहे. (डेंगी, टीबी, टायफॉइड, न्युमोनिया, इ. आजारांवर या योजनेअंतर्गत उपचार मिळत नाहीत.) देशातील ४३ हजार रुग्णालयांपैकी अशा प्रोसिजर्स करणारी फक्त ३० टक्के खासगी रुग्णालये या योजनेत मोडतात. एकूण रुग्णांच्या फक्त तीन टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. बाकी बाह्यरुग्ण असतात. त्यामुळे एकूण रुग्णांच्या एक टक्का रुग्णांनासुद्धा या योजनेचा फायदा होत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा