डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला दिले जावे, या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीने तब्बल १६ वर्षे संघर्ष केला, अनेकांच्या बलिदानानंतर अखेर १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्तार (‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’) करण्यात आला. या घटनेला यंदा ३० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात नामांतराचा लढा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरलेला आहे. तो आंबेडकरी चळवळीसाठी केवळ चळवळीच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा लढा नाही, तर तो वैचारिक संघर्षाचा, जातीयवादी मानसिकतेविरुद्धचा लढा आहे. या लढ्याने महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय वातावरण बदलले. त्यातूनच चळवळीत नवनवीन नेतृत्व निर्माण होऊ लागले. परंतु सामाजिक परिवर्तनाच्या आणि समतेच्या चळवळीच्या दृष्टीने या लढ्यानंतर आंबेडकरी चळवळीने जी गती घ्यायला हवी होती, ती अद्यापही दिसून येत नाही. किंबहुना पुन्हा एकदा सामाजिक, धार्मिक, जातीय, सांस्कृतिक संघर्ष अटळ बनलेला आहे. आंबेडकरी चळवळीच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक काळ निर्माण झालेला आहे. म्हणून सिंहावलोकन करणे गरजेचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा