प्रा. डॉ. केशव मेंढे
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३५२ नुसार भारताच्या किंवा राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागाची सुरक्षितता धोक्यात आली असल्याची किंवा सशस्त्र बंडाचा गंभीर धोका निर्माण होण्याची खात्री झाल्यास ते बंड प्रत्यक्षात घडण्यापूर्वी ‘आणीबाणी’ लागू करण्याची तरतूद आहे. त्यानुसार २५ जून १९७५ रोजी भारतात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती, यामुळे राजकीय प्रक्रियेला मोठा हादरा बसला होता. आणीबाणीच्या भाष्यकारांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्त्वाला दोष दिला. तत्कालीन कांग्रेसचे असंतुष्ट नेते, समाजवादी, जनसंघ (आताचा भाजप), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इत्यादी संघटनांच्या नेत्यांनी याविरुद्धच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे आणीबाणीच्या काळात रा. स्व. संघाचे बहुते कार्यकर्ते तुरुंगात गेले होते. म्हणूनच की काय सद्य:स्थितीत आणीबाणीचा दिवस जवळ आला की, संसदेत व संसदेच्या बाहेरसुद्धा भाजपचे नेते हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणावरून काढतात आणि जणू काही काँग्रेसने भारतावर फार मोठे संकट निर्माण केले होते, अशा आवेशाने बोलतात. इंदिरा गांधींना अपराध्याच्या पिंजऱ्यात उभे करू पाहतात. आता तर केंद्र सरकारने २५ जून ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा पवित्रा घेतला आहे. हा संविधानाच्याच अनुच्छेद ३५२चा अनादर नव्हे काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा