‘नीट’ परीक्षा घोटाळा हा मोठाच विश्वासघात आहे यात शंका नाही; पण अशा प्रकारच्या अतिमागणी असलेल्या परीक्षांमध्ये विहीत शिस्तीला फाटा देण्याचा प्रयत्न नेहमीच होत असतो काय, अशी शंका येते! चीनसारख्या तथाकथित ‘कडक शिस्तीच्या’ देशातील विद्यापीठ- प्रवेश परीक्षा ‘गाओकाओ’ म्हणून ओळखली जाते, तिथेसुद्धा गैरप्रकारांच्या कुरबुरी आहेतच. आपल्या परीक्षा व्यवस्थेबद्दलच विश्वास वाटेनासा होण्याचे कारण म्हणजे या घोटाळ्याची गुजरातपासून बिहारपर्यंत पसरलेली व्याप्ती. अन्य परीक्षादेखील ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने घोटाळ्याच्या शक्यतेमुळे रद्द केल्या, ही तर आपल्याकडे एखाददुसरा गैरप्रकार झालेला नसून व्यवस्थाच कुजकी आहे, याची कबुली ठरते. या अनेक परीक्षांना मिळून एकंदर ३० लाख विद्यार्थी बसतात, त्यांपैकी कित्येक लाखांवर मानसिक ताण, आर्थिक ओढाताण आणि शैक्षणिक नुकसान असे तिहेरी संकट यातून कोसळले आहे. सत्ताधाऱ्यांच्या नशिबाने, लोकसभेच्या निवडणुकीनंतर हा घोटाळा उघडकीला येण्याचा प्रसंग ओढवला. नाहीतर सरकारची फारच बदनामी झाली असती. आतादेखील, नव्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच विश्वासार्हतेवर हा कलंक लागला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा