प्रसाद माधव कुलकर्णी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची २४ ऑगस्ट २४ रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे नक्षलग्रस्त सात राज्यांतील अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘नक्षलवादविरोधी लढाई अंतिम टप्प्यात असून मार्च २०२६ अखेर देशातून नक्षलवाद्यांच्या नायनाट केला जाईल. नक्षलवादाची समस्या गंभीर आहे. त्यामुळे नक्षलवाद संपविण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. लोकशाहीला नक्षलवाद्यांचा मोठा धोका आहे. गेल्या चार वर्षांत नक्षलवाद्यांमुळे १७ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. त्यामुळे त्यांचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.’ नक्षलवादाचा बीमोड हा खरंच अतिशय महत्त्वाचा गंभीर विषय आहे. केंद्रीय गृहमंत्री आगामी दीड वर्षात त्याचा बिमोड करू असे म्हणतात हे स्वागतार्ह आहे. मात्र त्यासाठी नक्षलवादाचा इतिहास लक्षात घेऊन त्याचे योग्य प्रकारे निर्दालन करण्यासाठी फार कठोर पावले उचलावी लागतील आणि योग्य प्रकारे नियोजनही करावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा