सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून दिल्लीत उभारण्यात आलेल्या संघाच्या नव्या, सुसज्ज वास्तूची सध्या चर्चा सुरू आहे. एकेकाळी मालमत्ता निर्माण करायला विरोध करणाऱ्या संघापासून ते आज मालमत्तादार होण्यापर्यंतच्या संघाच्या वळणदार प्रवासाचा यानिमित्ताने आढावा ही घटना तशी जुनी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी असतानाची. तेव्हा संघाचा कार्यविस्तार संथगतीने का होईना पण अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने होत होता. कार्याचा व्याप जसा वाढायला लागला तशी आणखी जागा हवी, इमारती हव्यात अशी मागणी स्वयंसेवकांकडून समोर यायला लागली. हळूहळू या मागणीने व्यापक स्वरूप धारण केले. शेवटी काहींनी धाडस करून गुरुजींसमोर हा विषय छेडला. ते काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यांनीही फार वेळ लावला नाही व सर्वांना सांगून टाकले. ‘संघाला स्थावर संपत्ती निर्माण करण्यात रस नाही. जमिनी, त्यावर इमारती बांधण्यापेक्षा कार्यकर्त्यांची, म्हणजेच स्वयंसेवकांची बांधणी अधिक जोमाने करा, त्यातच संघाचे भवितव्य दडले आहे. संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाने स्वत: राष्ट्राला अर्पण केलेले असते. राष्ट्र हीच आपली संपत्ती मग इतर गोष्टींचा मोह कशाला? संघाला जी काही गुरुदक्षिणा मिळते त्यात साऱ्यांनी भागवायचे, उगीच संपत्ती निर्मितीचा ध्यास नको’. हे उत्तर ऐकून सारेच गप्प झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा