“मराठा आणि कुणबींमध्ये फरक आहे. जरांगे-पाटील मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सांगतात. पण, तसं काही नाही. जरांगे-पाटलांनी जातीचा आणि घटनेचा अभ्यास करावा. मी मराठा आरक्षणाचा अभ्यास केला आहे. मात्र, जरांगे-पाटील कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय राहणार नाही, असं बोलत आहेत.” एवढेच बोलून केंद्रीय मंत्री नारायण राणे थांबले नसून “९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही,” असेही म्हणाले आहेत. राणे यांची ही वक्तव्ये चित्रवाणी माध्यमातून, तसेच ‘लोकसत्ता’मधूनही प्रसृत झाली आहेत. त्यामुळे या विषयावर महात्मा फुले यांचे काही संदर्भ आठवले. महात्मा फुले हे त्यांचा ‘शेतकऱ्याचा असूड’ हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहीत असण्याच्या काळात त्यांना भेटायला एक गृहस्थ आले होते. त्यांना पाहून ते कोण किंवा कोणत्या जातीचे हे फुल्यांच्या लक्षात येत नव्हते. अशा परिस्थितीत त्या गृहस्थानेच संवाद चालू केला. तो खालीलप्रमाणे-
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा