अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, ‘वंचित बहुजन आघाडीच्या पराभवा’चे विश्लेषण करताना ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ‘बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा सल्ला’ दिला आहे. तशी बातमीही १८ जूनच्या ‘लोकसत्ता’मध्ये आहे. ही गोष्ट नाकारण्यात अर्थ नाही की, लोकसभा निवडणुकीत शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्य समाज विशेषतः मुस्लीम समाज एकदिलाने महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला! एका अर्थाने या सर्वांसाठी ही निर्णायक लढाई होती. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणूक निकालानंतर ‘वंचित बहुजन आघाडी’चे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमांतून जे पत्रक प्रसिद्ध केले, त्यात स्पष्ट म्हटले होते की, ‘मतदारांबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही!’ तरीसुद्धा, दलित (विशेषतः बौद्ध समाज) लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिला नाही, हे शल्य बोचत असल्यानेच ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी, ‘बौद्ध, दलितांना शहाणे होण्याचा सल्ला’ दिला असावा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असेही म्हटले की, ‘तुम्ही ‘त्यांचे’ (म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार- शिवसेना उद्धव ठाकरे) पक्ष वाचवलेत!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा