श्रीनिवास खांदेवाले, धीरज कदम
समाजाच्या आर्थिक जीवनात बरेच वेळा प्रचंड मोठ्या घटना घडतात व त्यांचे दुष्परिणाम दूर करणे किंवा नियंत्रित करणे याकरिता समाजाला बरेच काही नव्याने शिकावे लागते. आता जागतिकीकरणामुळे या घटना एखाद्या देशापुरत्या मर्यादित राहात नाहीत. त्या जागतिक स्वरूप धारण करतात आणि मग प्रत्येक देशाला व तेथील जनतेला त्यांच्या विशिष्ट परिस्थितीप्रमाणे त्याचे चटके सहन करावे लागतात. त्यातही उच्च उत्पन्नाच्या वर्गाचे लोक असे परिणाम सहजतेने पेलतात, मध्यम वर्गाचे लोक कसेतरी पेलतात आणि त्याचा सर्वाधिक फटका हा अल्प उत्पन्नाच्या लोकांना सोसावा लागतो. अशी संकटे कधीतरी एकेकटी आली तर त्यातून निभावून नेणे हे तुलनेने सोपे जाते; परंतु ही सगळी संकटे एकाचवेळी आली तर त्यांचे भयावह दुष्परिणाम समाजाला किंवा देशाला सोसणे क्रमप्राप्त ठरते. त्यामधून सावरण्यासाठी त्या देशांची सरकारे, आंतरराष्ट्रीय संस्था आणि समाजातील लोक हे दुष्परिणाम किती कमी करू शकतात हे त्यांच्या सुजाणपणावर अवलंबून आहे. आजच्या परिस्थितीत ही संकटे वेगाने तर येतच आहेत पण सगळी एकाचवेळी येत आहेत म्हणून त्यांना घोंघावणारी वादळे असे म्हटले आहे. या संकटांची संख्या जास्त असली तरी मूलभूत घटकांकडे लक्ष वेधण्यासाठी आपण तीन वादळी संकटांचा विचार करणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा