राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ५ सप्टेंबर रोजी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ समारंभात चक्क शिक्षक दिनीच राज्यातील शाळा कॉर्पोरेट क्षेत्रतील कंपन्यांना दत्तक देण्यासंदर्भात मत व्यक्त केले आणि शासनाने तातडीने १६ सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व माध्यमांच्या सुमारे ६२ हजार शाळांसाठी ‘दत्तक शाळा योजने’ला मंजुरी दिली. ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या गोंडस नावाखाली शासन शिक्षणाच्या जबाबदारीतून हात तर झटकत नाही ना, अशी शंका राज्यातील नागरिकांच्या मनात घर करून आहे. शिक्षणाच्या जबाबदारीचे ओझे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला झेपत नाही का, हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. याच दरम्यान शासनाने महाराष्ट्रातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी तब्बल चोवीसशे कोटींचा निधी मंजूर केला. दत्तक शाळा योजना आणि मंदिरांना कोटींचा निधी या दोन्ही शासन निर्णयांमधून शासनाला नेमके कशाला प्राधान्य द्यायचे आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा