– महादेव ईश्वर पंडित
सेतू हा शब्दच मुळात सुंदर आहे. नदी, नाला, खाडी, डोंगर, दरी, समुद्र तसेच मानवनिर्मित अडथळे पार करण्यासाठी जे बांधकाम केले जाते, त्याला सेतू म्हणतात. सेतूंनी गावे, शहरे, माणसे, मने, संस्कृती जोडली जाते. सेतू अर्थात पुलांनी अनेक गावे जोडली आहेत, खडतर प्रवास सुकर केला आहे. २५ मे २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवडी-न्हावा शेवा या सागरी मार्गाचे चाचणी परीक्षण झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गाडी चालवत शिवडी ते न्हावा-शेवा हे अंतर फक्त २० मिनिटांत पार केले. एरवी ते पार करण्यासाठी कमीत कमी एक तास खर्ची पडत असे. मुंबई ट्रान्स हार्बर सागरी मार्ग (एमटीएचएल) हा अति जलद, अति महत्त्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचा देशातील एक आदर्श नमुना आहे. हा सागरी सेतू नोव्हेंबर २०२३ अखेर लोकांच्या सेवेत रुजू होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा