अनुच्छेद ३७० बाबत गेल्या वर्षी निकाल देतानाच सर्वोच्च न्यायालयाने, जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ अगोदर घेण्याचे आदेश दिलेले आहेत. नुकताच मुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रदेशाचा दौरा करुन विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीर प्रदेशातील ५ लोकसभा मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाल्याने उत्साहात भर पडली असतानाच दुसरीकडे अतिरेकी हिंसाचारचे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या मुहूर्तावर जम्मू काश्मीर प्रदेशात झालेल्या अतिरेकी हल्ल्यापासून आजवर, १६ सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले. जम्मू काश्मीर प्रदेशात अनुच्छेद ३७० रद्द केल्यावर भौगोलिक, राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. हा बदल इतकाच मर्यादित नसून अतिरेक्यांनी आपल्या रणनीतीत केलेला बदल दुर्लक्षित करता येणारा नाही. प्रकाशित माहितीनुसार प्रदेशातील परिस्थितीबाबत अनेक धक्कादायक बाबी उघड होताहेत. वाढत्या हिंसक वातावरणार प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका घेणे हे एक मोठे आव्हान असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा