प. पू. धर्म व संस्कृतिरक्षक हो,
जय सियाराम!
जुन्या सवयी जात नाहीत म्हणून माफी असावी! आम्ही जुन्या शिरस्त्याप्रमाणे सिया व राम दोघांचे नाव घेतले. आपण श्रीरामाला त्याच्या जन्मस्थानी पुनर्वसित केल्यानंतर सियाबाईना भूमिगत करून (माहेरी पाठवून?) फक्त ‘जय श्रीराम’ म्हणण्याचा दंडक घातला हे आम्ही विसरूनही गेलो होतो. इतिहासातल्या गैरसोयीच्या गोष्टी विसरण्याइतके ‘कडवट’ हिंदू आम्ही अद्याप झालो नाही ना! दर वर्षी व्हॅलेंटाइन डे आला की तुमची आठवण हमखास येते. कारण गेली दहा वर्षे आपण म्लेंच्छांनी या भूमीत आणलेल्या या बाजारू प्रेमदिनाला विरोध करीत आहात. पण पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखालील स्वाभिमानशून्य भारतीय (पुन्हा चुकलो, हिंदू) ते अजूनही मनावर घेत नाहीत. या संदर्भात मला दहा वर्षांपूर्वी आपल्यापैकी एका महनीय व्यक्तीने – श्री चंद्रप्रकाश कौशिकजी, अध्यक्ष, हिंदू महासभा – ह्यांनी केलेल्या एका घोषणेची तीव्रतेने आठवण होते. ते केवळ म्लेंच्छ संस्कृतीतील व्हॅलेंटाइन डेला विरोध करून थांबले नाहीत; त्यांनी त्याला एक समर्थ पर्यायही दिला. ते म्हणाले होते की ‘त्याऐवजी आपल्या संस्कृतीला अभिप्रेत असलेली वसंत पंचमी साजरी करा.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा