-रमेश पाध्ये
हरितक्रांतीमुळे धान्योत्पादनात वाढ जरुर झाली, परंतु त्याचबरोबर अनेक समस्या निर्माण झाल्या. या समस्यांची दखल ना राज्यकर्त्यांनी घेतली, ना कृषी वैज्ञानिकांनी घेतली. परिणामी कालौघात कृषी समस्या उग्र झाल्या. उदाहरणार्थ, तांदुळ आणि गहू यांच्या अधिक उत्पादक वाणांसाठी रासायनिक खतांचा वाढता वापर अनिवार्य ठरला. अशा खताांच्या उत्पादनासाठी खनिज द्रव्यांचा वापर होत असल्यामुळे १९७३ साली ‘ओपेक’ राष्ट्रांनी खनिज तेलाच्या किमती सुमारे चौपट केल्यावर स्वाभाविकपणे रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्या. अशा परिस्थितीत धान्यांच्या उत्पादन खर्चात वाढ होऊ नये आणि शेतकऱ्यांच्या नफ्यात घसरण होऊ नये या उदात्त हेतूने केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती कृत्रिमरित्या रोखून धरल्या. या प्रक्रियेचा आर्थिक भार केंद्र सरकारला उचलावा लागतो. त्यासाठी आजच्या घडीला वार्षिक सुमारे दोन लाख ५० हजार कोटी रुपयांचा भार केंद्र सरकारच्या तिजोरीवर पडतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा