निशांत सरवणकर
कुख्यात गुंडमनोहर अर्जुन ऊर्फ मन्या सुर्वेची वडाळा येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाजवळ जानेवारी १९८२ मध्ये पोलिसांबरोबर झालेली चकमक ही मुंबईतील पहिली चकमक म्हणून ओळखली जाते. खंडणीस नकार देणाऱ्यांवर अॅसिड हल्ला करण्यास मन्याने सुरुवात केली. त्यात एका व्यापाऱ्याचा मृत्यू झाला तर काही गंभीर जखमी झाले. अखेरीस पोलिसांनी ‘ऑपरेशन मन्या सुर्वे’ हाती घेतले आणि तो पोलिसांबरोबरच्या चकमकीत मारला गेला. मन्या सुर्वेला मारणाऱ्या इसाक बागवान, राजा तांबड या अधिकाऱ्यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतरच्या आठ वर्षांत (१९९० पर्यंत) पोलिसांकडून ३४ गुंड चकमकीत मारले गेले. कुणाही अधिकाऱ्याला चकमकफेम ही बिरुदावली मिळालेली नव्हती. १९९१ नंतर २०१० पर्यंत मात्र ७३० गुंड चकमकीत ठार करण्याचा उच्चांक झाला. त्यातूनच ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांची जमात उदयास आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा