रमा बारू
भारताच्या ‘लोकसंख्या लाभांशा’ची चर्चा भरपूर वेळा होते. भारत हा तरुणांचा देश आहे असे अभिमानाच्या सुरात सांगितले जाते. शिवाय बऱ्याचदा, तरुणाईचा योग्य वापर न केल्यास ‘लोकसंख्या लाभांश’ मिळणार कसा, अशी चिंताही व्यक्त होत असते. याच्या पलीकडे जाऊन आपण एकंदर लोकसंख्येचा विचार करणार आहोत की नाही? तो केला, तर असे दिसेल की येत्या काही वर्षांत वृद्धांची- ज्येष्ठ नागरिकांची- संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे आणि धोरणकर्त्यांना- सरकारला या वाढत्या वयस्कर लोकांसाठी निर्वाहवेतन (पेन्शन) किंवा अन्य सुविधांचा विचार करावाच लागणार आहे. हे प्रमाण वाढेल म्हणजे किती? २०११ च्या जनगणनेनुसार, देशाच्या एकंदर लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिक अवघे ८.६ टक्के होते; तर २०५० मध्ये एकंदर लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण २०.८ टक्क्यांवर गेलेले दिसू शकते. यात राज्यवार फरक असतीलच, ते आजही आहेत. पण आयुर्मान वाढते आहे आणि त्यामुळे ज्येष्ठांची संख्या वाढणारच आहे, एवढे नक्की. मुद्दा आहे तो याबद्दल आपण काय करणार आहोत, हा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा