सर्वोच्च न्यायालयात नुकतीच चंद्रमणी त्रिपाठी नामक व्यक्तीने भारतात होणारे सर्पदंश या गंभीर विषयावर याचिका दाखल केली आहे. न्या. भूषण गवई व न्या. के. व्ही. विश्वनाथन यांनी याचिकेची दखल घेत ३७ मुख्य सचिव व नायब राज्यपालांच्या सचिवांना प्रतिवादी केले आहे. १३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी घेत, चार आठवड्यांनी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. याचिकेत देशभरात अत्यंत महत्वाच्या सर्पदंश विषयावरील विषरोधक औषधांचा पुरवठा, २०१७ साली आदर्श उपचार मार्गदर्शक सूचनांचे पालन इत्यादी सर्पदंश विषयावर लक्ष वेधण्यात आले आहे. सर्पदंश समस्येवर अतिशय गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालयाने प्रकरणाची तात्काळ दखल घेतली असली तरी यातील एकूण प्रतिवादी बघता यात निश्चितच काही वेळ जाईल… आणि कुणाचीही इच्छा नसली तरी, सर्पदंशाने मृत्यूदेखील होत राहातील. पण या निमित्ताने एक गंभीर विषय चर्चेत आला हेही चांगलेच.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा