संसदेच्या दोन्ही सभागृहांत ‘संविधान’ या विषयावर चर्चा होत असताना, हल्ली अनेकदा विचारला जाणारा एक प्रश्न मात्र टाळला गेला. ‘भारतीय संविधानात भारतीय काय आहे?’ हा तो प्रश्न. तो विरोधी पक्षीयांनी विचारला नाहीच, पण सत्ताधाऱ्यांनीही टाळला. लोकसभा निवडणुकीत भाजपचे हात पाेळल्यामुळे आता इतक्यातच हा प्रश्न काढायला नको, असा व्यवहारी हिशेब भाजपने केला असणे शक्य आहे. भाजपने संसदेतल्या चर्चेत संविधानाचे गोडवेच गाण्याचे ठरवून, संविधानावर टीका करण्याचे वा त्याबाबत शंकाकुशंका उपस्थित करण्याचे काम संसदेबाहेरच्या अनुयायांवर किंवा ‘समविचारी लोकां’वर सोडून दिले आणि मग पंतप्रधानांना ‘संविधानाचा तारणहार जर कुणी असेल तर तो मीच’ या छापाची नाट्यछटा छानपैकी सादर करता आली. ‘भारतीय संविधानात भारतीय काय आहे?’ हा प्रश्न हाताळणे वा त्याचे समर्पक उत्तर देणे कदाचित विरोधी पक्षीयांनाही कठीण वाटत असावे आणि म्हणून त्यांनीही तो सोडूनच दिला असावा. राहुल गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख केला तेव्हा खरे तर हा प्रश्नसुद्धा आपसूकच उपस्थित होऊ शकला असता, पण तसे झालेले नाही. अर्थात, संविधानाबद्दलची असली तरी हीदेखील चर्चा एकंदरीत नेहमीसारखीच- राजकीय उणीदुणी काढण्यात समाधान मानणारी ठरली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा