अमेरिकेने मालवाहतूक विमानातून बेकायदा स्थलांतरित भारतीयांना बेड्या ठोकून परत पाठवले हा भारत देश विश्वगुरू झाल्याचा जणू पुरावाच आहे. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण! जेवढा जास्त अपमान सहन करण्याची क्षमता तेवढी जास्त संधी! बऱ्याच लोकांना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले नाही. आपण अमृतकाळात प्रवेश करतोय आणि २०४७ पर्यंत विकसित देश होणार आहे, असे आपले पंतप्रधान कानीकपाळी ओरडून सांगत असतानाही बेकायदा स्थलांतर करणारे भारतीय नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने वाढत आहेत, त्याविषयी सरकार एक चकार शब्दही बोलण्यास का तयार नाही? या प्रश्नाचे उत्तर सरकारसाठी गैरसोयीचे असले, तरी सत्य आहे. अशा प्रत्येकच बाबतीत विद्यमान सरकारची भूमिका अशीच राहिली आहे, हे सर्वांनी बघितले आहेच. कोलंबियाच्या अध्यक्षांनी काहीएक भूमिका तरी घेतली. आपले प्रमुख मात्र मूग गिळून गप्प आहेत. आता अजून अशी डझनभर विमाने येऊ घातली आहेत. अमेरिकेत अंदाजे सव्वादोन लाख बेकायदा भारतीय असून तेथील तुरुंगात असे सुमारे १८ हजार बेकायदा भारतीय असल्याच्या बातम्या येत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा